न समजलेले भगतसिंग

भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी 8 एप्रिल 1929 रोजी सेंट्रल लेजिस्लेटिव असेम्बली (कायदेमंडळ) मधे बॉम्ब फोडला. त्या दिवशी नेमके काय घडले?बॉम्ब फोडण्यामागे नेमके काय कारण होते?त्यातून काय साध्य झाले?शेवटी,इतरांप्रमाणे बॉम्ब फोडल्यावर भगतसिंग पळून का गेले नाहीत?आत्मसमर्पण करुन त्यांनी काय साध्य केले? भारतात स्वातंत्र मिळवण्यासाठी अनेक चळवळी झाल्या.त्यातील एक मुख्य म्हणजे क्रांतिकारी चळवळ.गदर असो या हिंदुस्तान… Read More न समजलेले भगतसिंग

जालियनवाला बाग आणि जनरल डायर, मायकल ओडवायर यांचा निर्लज्जपणा

13 एप्रिल, शनिवार.. बैशाखीचा दिवस. हजारोंच्या संख्येने शीख समुदाय जालियनवाला बागेत जमला होता. जनरल रिजनाल्ड डायर 90 लोकांची एक तुकडी घेऊन जालियनवाला बागेकडे निघाला. त्याने सोबतच्या गाड्यांवर मशीनगन्स चढवल्या होत्या.बागेत जाण्यासाठी एकच चिंचोळा रस्ता.. गाड्या आत नेता येत नसल्यामुळे डायर आणि त्याची तुकडी मार्च करत आतमध्ये निघाली. … Read More जालियनवाला बाग आणि जनरल डायर, मायकल ओडवायर यांचा निर्लज्जपणा

अठरा दिवसांचा बादशाह

खाली दिलेलं पेंटींग हे मुघलांच्या उत्तरकाळात तयार करण्यात आलेल सर्वात महागडं पेंटींग. हे चित्र पूर्णपणे सोन्याने तयार केलेलं आहे. चित्राच्या मध्यभागी असलेलं सिंहासन सोन्याचे, त्यावर पाचू, माणिके लावलेले.. … Read More अठरा दिवसांचा बादशाह

मंदिरांविषयी

मंदिरांविषयी प्रचंड गैरसमज समाजात पसरलेले आहेत. विशेषतः प्रत्येक मंदिर एकतर पांडवांनी बांधले.. किंवा हेमाडपंथी असते. लोककथांमध्ये छुपे अर्थ असतात. त्या त्या स्थानिक पातळीवर या कथांच्या आधारे बरीच मिथके उजेडात येण्यास मदतसुद्धा होते. क्षेत्रमाहात्म्य-स्थानमाहात्म्य बऱ्याच वेळी महत्वाची पण विस्मृतीत गेलेली माहिती देतात… Read More मंदिरांविषयी

New Lord of karnataka “छत्रपती शिवाजी महाराज”..

इसवी सन 1659 पर्यंत शिवाजी महाराजांचा विजापूरच्या आदिलशाहीसोबत जोरदार संघर्ष सुरू होता. यादरम्यान औरंगजेब दक्खनेतच होता.जुन्नरचा प्रसंग सोडल्यास, शिवाजी महाराजांनी मुघलांवर थेट वार केल्याचे उदाहरण सापडत नाही. त्यातही, उत्तर कोकण भागावरून मुघल-आदिलशाही राज्यांमधील संघर्षाचा फायदा उचलत शिवाजी महाराजांनी या भागावर आपले वर्चस्व प्रस्थापित करायला सुरुवात केली होती. इकडे अफजलखान मारला.. पन्हाळ्यापर्यंत मुलुख जिंकला. विजापूरचा सरदार… Read More New Lord of karnataka “छत्रपती शिवाजी महाराज”..

औरंगजेब आणि शिवछत्रपती

‘शिवाजीने संपूर्ण आशिया खंडासोबत युद्ध छेडले आहे.’ अशी नोंद एका इंग्रज प्रवाशाने करून ठेवली आहे. शिवाजी महाराजांचा लढा ऐऱ्या-गैऱ्या राजासोबत नव्हता, तर एका खंडप्राय देशाएवढे साम्राज्य असणाऱ्या ‘औरंगजेब’ बादशाहसोबत होता. शिवरायांच्या ताकदीचा अंदाज येतो, तो इथे.… Read More औरंगजेब आणि शिवछत्रपती

बिचित्रचे चित्र

उत्तर मध्ययुगीन काळामध्ये भारताच्या वेगवेगळ्या भागात अनेक चित्रशैली उदयास आल्या. त्यामध्ये मुघलांची शैली, गोवळकोंडा शैली, मराठा शैली यांनी प्रामुख्याने लोकप्रियता मिळवली. उत्तर भारतात तर शेकडो चित्रकार अकबर, जहांगीर, शाहजहान वगैरे बादशाहांच्या दरबारात कार्यरत होते. त्यांची नावे आणि त्यांनी काढलेली वैशिष्टयपूर्ण चित्रे यांची यादी करायची म्हणलं, तरी लांबलचक काम होईल. अकबराच्या दरबारातील सय्यद अली आणि अबू… Read More बिचित्रचे चित्र

राष्ट्रकूट

भारताचा सुवर्णकाळ समजलं जाणारं ‘गुप्त साम्राज्य’ अत्यंत सुबक मूर्ति घडवण्यासाठी कारणीभूत ठरलं.. गुप्तांमुळे आयुध पुरुषांना मूर्तिशास्त्रात वेगळे महत्व आणि उंची प्राप्त झाली. उत्तर भारतात गुप्तांचे राज्य होते, त्यावेळेस महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात वाकाटक राजघराणे आपले वर्चस्व प्रस्थापित करत होते. विष्णूपूजक गुप्तांनी आपली मुलगी वाकाटकांच्या घरात दिली. ‘महाभैरव’ भक्त असलेलं शिवपूजक घराणं वाकाटक.. शैव-वैष्णव संप्रदायाचा मिलाफ झाला… Read More राष्ट्रकूट

‘दास्तान-ए-फील’

जवळ-जवळ सर्वच मध्ययुगीन राजसत्तांचा ‘हत्ती’ हा आवडता प्राणी होता. मराठा, विजापुर, मुघल, गोळकोंडा यांच्या चित्रांमधून आपल्याला हत्तींच्या चित्रांना विशेष स्थान दिल्याचे आढळून येते.… Read More ‘दास्तान-ए-फील’